CAA विरोधातल्या हिंसाचारात दिल्लीनंतर या राज्यातही २ जणांचा मृत्य, १० जणांवर चाकूहल्ला शिलाँग, दि. १ (वृत्तसंस्था): नागरिकत्व संशोधन कायद्यासंदर्भात दिल्लीमधील हिंसाचार उफाळला होता. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर आता मेघालयातून बातमी आली आहे. येथे नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध व समर्थन करणाऱ्यांमध्ये उद्भवलेल्या दंगलीत एका जमावाने शनिवारी शिलाँग येथील गर्दी असलेल्या बाजारात चाकूने हल्ला केला. या जमानाने शिलाँग येथील अनिवासितांवर हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. याशिवाय शिलाँगमधील लॉग्संग, चेरापूंजी शहरातील ल्यू सोहरा बाजारातही हल्ला झाला असून यामध्ये २ अनिवासित जखमी झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी खासी छात्र संघ (घडण) आणि आदिवासी नसलेल्यांमध्ये मारामारी झाली. यामध्ये बांगलादेशाच्या सीमाजवळील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील इचमती परिसरातील एका स्थानिक टॅक्सी चालकाची हत्या करण्यात आली होती. सरकारने १ मार्चच्या सकाळपर्यंत शिलाँग बाजार आणि त्यांच्या जवळील क्षेत्रात कयूंची घोषणा केली होती. यावेळी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे दोन गट तैनात करण्यात आले होते. आणखी काही गटांचे पाचारण करण्यात आले होते. शिलाँगमधील सर्वात जुन्या बाजारांपैकी असलेल्या बारा बाजारावर झालेल्या हल्ल्यातील सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील २९ वर्षीय रुपचंद दीवन यांनी रस्त्यात जीव सोडला. लॅग्सिंगमध्ये २१ वर्षीय आकाश अली याच्यावर हल्ला करण्यात आला. या हिंसाचारानंतर येथून ८ जणांना अटक करण्यात आले आहे. शिलाँग येथील हिंसाचाराचा संशय असल्याने अनेक भागांमधील मोबाइल सेवा रद्द करण्यात आली होती. शिवाय दिवसाला ५ एसएमएस पाठविण्याची मर्यादा ठेवण्यात आली होती. सीएएवर चर्चा करण्यासाठी केएसयूच्या बैठकीत आणि इनर लाइन परमिट (आयएलपी) लागू करण्याच्या मागणीनंतर झालेल्या वादंगात इचमती येथे राहणाऱ्या लुरशाई हाइनेविता (३५ वर्ष) यांचा मृत्यू झाला. मेघालयातील मोठ्या भागात सीएए लागू करण्यात येणार नसून व्यावहारिक स्वरुपात जर पाहिलं तर हे संपूर्ण राज्य सहाव्या अनुसूचीअंतर्गत येतं. इनर लाइन परमिट हे अनिवासी लोकांना येथे प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठीचं डॉक्युमेंट आहे. डिसेंबरमध्ये सीएए पारित केल्यानंतर मेघालय विधानसभेत आयएलपी लागू करण्यासाठी सर्वांच्या संमतीनुसार एक प्रस्ताव पास करण्यात आला आहे.
जपानमध्ये मालवाहू बोट बुडाली, १३ जण बेपत्ता ओमोरी
(वृत्तसंस्था) : जपानच्या ओमोरी किनाऱ्याजवळ मालवाहू बोट बुडाली. या बेटीची एका मासेमारी करणाऱ्या बोटीशी धडक झाली. यामुळे ही बोट बुडण्याची घटना घडली, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. या धडकेनंतर मासेमारी करणारी बोट ताबडतोब किनाऱ्याकडे परतली.या मालवाहू बोटीवरील सर्व खलाशी चीन, व्हिएतनाम, फिलिपीन्स या देशांचे नागरिक होते. त्यांच्यापैकी केवळ एकाचा वाचवण्यात यश आले आहे. बाकीचे १३ जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांच्या तपासासाठी गस्तीवरील ४ बोटी पाठवण्यात आल्या आहेत.